जळगावताज्या बातम्यापर्यावरण

दुपारपासून सायंकाळपर्यंतच्या मुसळधार पावसाने रावेर तालुका जलमय; नदी-नाल्यांना पूर

रावेर (प्रतिनिधी) : काल दुपारपासून सायंकाळपर्यंत रावेर तालुका व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. काही तासांच्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून अनेक ठिकाणी पाणी वेगाने वाहताना दिसून आले.

तालुक्यातील लहान-मोठे नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, तर नदीपात्रांमध्ये पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले. नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती, मात्र प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील काही सखल ठिकाणी पाणी साचले. रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे, खरीप हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेततळी, विहिरी आणि जलसाठ्यांमध्येही पाण्याची आवक वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button