
जळगाव (प्रतिनिधी) : बसस्थानक परिसरात वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः महिलांच्या दागिन्यांवर आणि प्रवाशांच्या बॅगांवर चोरट्यांचे लक्ष केंद्रित असल्याचे दिसून येत आहे.
बसमध्ये चढताना किंवा उतरताना होणाऱ्या गोंधळात चोरटे हातसफाई करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही प्रवाशांचे मोबाईल, रोकड आणि दागिने चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस प्रशासनाने बसस्थानक परिसरात गस्त वाढवली असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात तसेच गर्दीत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे।



