ऐतिहासिकजळगावताज्या बातम्याधुळेनंदुरबारमहाराष्ट्रयोजनाराष्ट्रीय-राज्यशासकीयशैक्षणिकसामाजिक

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घराघरात फडकणार राष्ट्रध्वज

जळगाव (प्रतिनिधी) : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक घर, दुकान, खाजगी आस्थापना तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या अभियानात सहभागी होऊन आपल्या घरावर व आस्थापनांवर राष्ट्रध्वज लावावा आणि राष्ट्रध्वज लावतानाच्या नियमांचे पालन करावे. तसेच, ध्वजासोबत छायाचित्र काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे.

या अभियानात सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button