
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह राज्यात उष्णतेचा तीव्र परिणाम जाणवत असून तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दुपारच्या वेळेत रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी अधिक प्रमाणात पिणे व उन्हात जाणे टाळण्याचेही सांगण्यात आले आहे.




