आयटीसी संगीत महोत्सवात जळगावकर रसिक तल्लीन!

जळगाव ( प्रतिनिधी) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. या दोन दिवसात अकादमीचे दोन स्कॉलर व दोन प्रतीथ यश कलावंतांचा सहभाग आहे.
आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीप प्रज्वलन आयटीसी संगीत अकादमीचे गुरु पं. ओंकार दादरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे सत्कार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले.
अकादमीच्या वतीने गुरु पं. ओंकार दादरकर यांनी रसिकांशी संवाद साधला. पहिल्या सत्रात अकादमीचा युवा कलाकार कौस्तव रॉय यांनी सरोद वादन सादर केले त्यांना तितकीच समर्थ तबल्याची साथ भोपाळ येथील रामेंद्र सिंह सोळंकी यांनी केली. कौस्तव यांनी राग श्री मध्ये जोड आणि झाला सादर करून रसिकांना रीजविले. त्यानंतर धमार व अध्दा तालात निबद्ध रचना सादर केल्या आणि रसिकांची वाहवा मिळाली.
यानंतर दुसऱ्या सत्रात अकादमीचे गुरु पंडित ओंकार दादरकर यांनी विलंबित झुमरा तालात मारुबिहाग रागातील बडा ख्याल “जागे मेरे भाग” सादर केले, त्यानंतर “पारी मोरी नाव” ही दृत एकतालातील बंदिश सादर केली. त्यानंतर विदुषी गिरीजादेवी यांनी स्वरबद्ध केलेला दादरा सादर केला हा दादरा मिश्र किरवाणी रागामध्ये निबंध होता “तुम बिन गाईन” सादर केला. त्यानंतर विदुषी माणिक वर्मा ज्या ओंकारच्या आत्या आहेत त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे.
त्यांनी गाऊन आजरामर केलेलं “अमृताहुनी गोड नाम तुझे देवा” हे भजन व संगीत कान्होपात्रा या नाटकातील अजरामर भैरवी “अगं वैकुंठीचे राया” गाऊन आपल्या मैफीलीची सांगता केली. ओंकार यांना तबल्यावर युवा तरुण आश्वासक तबलावादक तेजोवृष जोशी तर संवाद युनिवर अनंत जोशी यांनी अप्रतिम साथ सांगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अनघा नाईक गोडबोले यांनी उत्तमरीत्या केले व कार्यक्रमाची रंगत वाढवली.




