
गिरणा धरणात पाणी, मात्र शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची प्रतीक्षा!
कालव्याला तातडीने आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांची चिंता वाढली आहे. पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची लागवड केली आहे. मात्र पावसाचा खंड वाढत चालल्याने कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
💧 गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी
दरम्यान, गिरणा धरणात पाणीसाठा उपलब्ध असताना पावसाअभावी खरीप पिकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गिरणा धरणातून कालव्याला आवर्तन सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
“धरणात पाणी उपलब्ध आहे, मग पिकांना पाणी कधी मिळणार?” असा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाने आणखी ओढ दिल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन कालव्याचे आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
🔴 शेतकऱ्यांचा थेट सवाल
“गिरणा धरणात पाणी असूनही आमची पिके पावसाच्या प्रतीक्षेत का?”



