ताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक
जिनिअरिंग-फार्मसी प्रवेशात बदलाची शक्यता; बारावीच्या गुणांनाही मिळणार महत्त्व

जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे. सध्या प्रवेशासाठी MHT-CET परीक्षेतील गुणांना मोठे महत्त्व आहे. मात्र, बारावीच्या परीक्षेतील गुणांचाही प्रवेश प्रक्रियेत किती वाटा असावा, याचा अभ्यास करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.
बारावी आणि MHT-CET या दोन्ही परीक्षांच्या गुणांना कोणत्या प्रमाणात महत्त्व द्यायचे, तसेच त्याचा प्रवेश प्रक्रियेवर होणारा परिणाम याचा समितीकडून अभ्यास केला जाणार आहे. समितीच्या अहवालानंतरच पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हा बदल अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या प्रवेश नियमांमध्ये तातडीने बदल झाल्याचे समजणे योग्य ठरणार नाही.



