क्राईमजळगाव

अफवेमुळे जडीबुटी विक्रेत्यांना बेदम मारहाण

अफवांवर विश्वास ठेवू नये – पोलीस प्रशासनाकडून आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा या गावांमध्ये फिरतीवर असलेल्या दोन जडीबुटी विक्रेत्यांचा वाद झाल्याने अफवेमुळे जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. जस्सानाथ आणि मोनूनाथ हे साधू नसून हरियाणामधून आलेले आहेत. सध्या ते मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहून जडीबुटी विक्रीचे काम करतात. कोणतीही अफवा पसरवू नका आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

सिरसा (हरियाणा) येथील जडीबुटी विक्रेते जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) व मोनूनाथ जस्सानाथ (वय २०) – सध्या मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहत असून ते जडीबुटी विक्रीसाठी मुंजलवाडीत आले होते. त्यांनी एका ग्रामस्थाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अफवा पसरली यानंतर जमावाने त्यांना मारहाण केली. तत्यांनी आपल्या गाडीतून पळ काढला. मात्र कुसुंबा आणि लोहारा येथे पुन्हा त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या घटनेदरम्यान त्यांच्या गाडीची तोडफोड देखील झाली.

दोन तक्रारी दाखल
घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य गंभीर परिणाम टळला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका तक्रारीत इकबाल मोहंमद तडवी यांनी वाहनाचा कट लागल्याचा उल्लेख केला असून दुसरी तक्रार जडीबुटी विक्रेत्यांच्या वतीने मारहाण करणाऱ्यांविरोधात दाखल होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button