बंजारा समाजाचा ठाण्यात ४ ऑक्टोबरला भव्य एल्गार मोर्चा

मोहने-आंबिवली येथे बंजारा आरक्षण संदर्भात झालेल्या बैठकीत निर्धार
जळगाव (प्रतिनिधी) : हैद्राबाद गॕझेट नुसार ST (अनुसूचीत जमाती) चे आरक्षण लागू व्हावे यासाठी बंजारा आरक्षण समिती, ठाणे जिल्हा यांच्यावतीने शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा च्या नियोजन व सहभागी होण्याच्या संदर्भात मोहने-आंबिवली येथील संत सेवालाल महाराज मंदिरावर २७ सप्टेंबर रोजी बैठक झाली.
या बैठकीस मोहने-आंबिवली, अटाळी, नेपच्यून आणि टिटवाळा येथी समाज बांधव उपस्थित होते. प्रत्येकांनी आपले विचार मांडले व मोर्चामध्ये जास्तीतजास्त समाजबांधवांना कसे उपस्थित रहायचे याबद्दल चर्चा करण्यात आली.
मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
या मोर्चासाठी मोहने-आंबिवली परिसरामधे लागणारे १० प्रचार बॕनर हे येथील समाजसेवक तथा चिरंजीव लहान मुलांचे हॉस्पिटलचे संचालक डॉ.युवराज राठोड यांनी छपाई करुन देण्याचे जाहीर केले. तसेच डोंबिवली येथील समाजसेवक देविदास चव्हाण यांनी सर्व समाजबांधवांनी या मोर्चा मधे पारंपारिक बंजारा पोशाख परिधान करून उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कैलास पवार, जिल्हा अशासकीय सदस्य कैलास तंवर, अनिल राठोड, जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोक चव्हाण, आंबिवली तांड्याचे कारभारी कपुरचंद पवार, पत्रकार तथा मुंबई धर्मादाय रुग्णालय समितीचे सदस्य कविराज चव्हाण, समाजसेवक करसन राठोड, उमेश पवार, विष्णू पवार, विनोद जाधव, रामसिंग चव्हाण, सुनिल जाधव, अनिल राठोड, बंजारा समाज संस्थेचे संचालक तथा पुजारी-विठ्ठल राठोड, रमेश राठोड, सुरेश नाईक, अजय जाधव, श्रीराम पवार, सोमलू पवार, संतोष पवार, अशोक चव्हाण, ईश्वर राठोड, किरण राठोड, थानसिंग राठोड, दिलीप चव्हाण, टिटवाळा येथील समाजसेवक-अंकुश चव्हाण, केवलसिंग तंवर, संतोष राठोड यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.




